लाल पिवळ्या उजेडात वाहनांची वर्दळ पुढे
सरकत होती. उगाच अस्तित्व टिकवून असलेला तो निष्पर्ण वृक्ष अक्राळ विक्राळ सावल्या
पसरवत होता. मुंग्या सारख आपल अस्तित्व, पण त्या उंच वृक्षाचा तोच तोच सजीवपणा मला
तेव्हा खूप काही सांगून गेला. शर्यत करून ठेवलय आयुष्य आपल. मुळात घड्याळ ही
संकल्पना जन्माला यायलाच नको होती. त्या पक्षांना कस तेवढचं कळत की गगनराज भास्कर
मावळले की परत फिरायचे? या गडकरींनी तो “तळीराम” आणि त्या तेंडूलकरांनी हा “सखाराम”
रेखाटले, पण कोणी त्यांना तसे केले? मुळात एखाद्या गोष्टीसाठी अमूल्य वेळेचे
मुल्यांकन करणे हा न्यायचं मला पटत नाही. मुलभूत गरजा पूर्ण झाल्या की पुरे असतच
की. खरंच, मानवी (Human) मोड हरवलाय. लहानपणापसून २२-२४ इंची सायकल द्या, कशाला
उंचीसाठी शास्त्रज्ञांचे पुरावे? विरोधाभास तर इतके झाले, शाळेत जाताना रस्ता
दोन्ही बाजूंना बघून ओलांडायचो, आता त्याचे नियम बनले.
आज काल तर त्या म्हशींच्या पाठीवर बसणाऱ्या बगळ्याचा सुद्धा complex येतो. स्वच्छंदी या शब्दाचा अर्थ दिवसेंगणिक, व्यक्तिपरत्वे, जागेनुसार, नात्यांसाठी आणि दाखवण्यापुरता बदलत जातो. का? एवढ्या dependancy कश्या आल्या? बाभळीचा दांडू खुर्पीने सालणाऱ्या हाताला “excel” मध्ये कशी गोडी लागणार? आता संकरित भेंडी देखील तेच देणार आणि त्यात घालायचा मसाला सुद्धा तेच देणार, चांगली चव सुद्धा त्यांचा चेहराच सांगणार. निर्णयक्षमते-वर प्रश्न विचारण्याचा हक्कचं का द्यावा?
गुलझारांनी सांगेपर्यंत सजीवपण न समजण्याइतके हतबल का
झालेलो? समाधान हे एकच परिमाण आहे. आर्थिक, सामाजिक, मानसिक हे तर धंद्या
वाल्यांचे मुलामे आहेत. पक्ष्यांच गाण गोड भासतं हे मुळात त्यांच्या आवाजापेक्षा
त्यांच्या जगण्याच्या शैलीच श्रेय आहे. तेच पक्षी उद्या या निष्पर्ण वृक्षांच्या
फांद्यांवर बसून सजीवतेच जाणते दर्शन देतील आणि मी (आपण?) नेहमीप्रमाणे स्वगत करत
धावत राहीन..स्थैर्यासाठी..जीवनासाठी..!!आज काल तर त्या म्हशींच्या पाठीवर बसणाऱ्या बगळ्याचा सुद्धा complex येतो. स्वच्छंदी या शब्दाचा अर्थ दिवसेंगणिक, व्यक्तिपरत्वे, जागेनुसार, नात्यांसाठी आणि दाखवण्यापुरता बदलत जातो. का? एवढ्या dependancy कश्या आल्या? बाभळीचा दांडू खुर्पीने सालणाऱ्या हाताला “excel” मध्ये कशी गोडी लागणार? आता संकरित भेंडी देखील तेच देणार आणि त्यात घालायचा मसाला सुद्धा तेच देणार, चांगली चव सुद्धा त्यांचा चेहराच सांगणार. निर्णयक्षमते-वर प्रश्न विचारण्याचा हक्कचं का द्यावा?