सदर
शीर्षकाचा आणि खालील लेखाचा तसा काही एक संबंध नाही. अर्थात माझ्या कल्पनेत, उपमेत
हे बसले म्हणून..
मराठी रंगभूमी. तथाकथित, स्वयंघोषित राजकीय, चित्रपट समीक्षकांचा आवडतीचा विषय. त्याच पंक्तीतल्या ‘क्ष’ नावाच्या व्यक्तीने असाच आपल्या कधीही न भेटलेल्या फेसबूकवरिल आंधळ्या अनुयायांसमोर एक २५० शब्दांचा लेख प्रस्तूत केला. अर्थातच विषय बहुसंख्य मराठी जनसमुदायाला आवडेल, पटेल असाच होता. विषयाची एक बाजू होती, मराठी सिने अभिनेत्यांनी हिंदी मध्ये केलेल्या दुय्यम भूमिका ज्याच्याशी मी पण सहमत आहे आणि दूसरी बाजू होती मराठी आणि दक्षिणात्य चित्रपटांची केलेली तूलना, अर्थात जी देखील सगळ्यांना पटणारी पण तांत्रिक दृष्ट्या कधीही न सिद्ध होणारी..
प्रेमाचे लव्हाळे कविता आठवते का? एवढ्या वादळात, पावसात, लाटांत सुद्धा ते आपले अस्तित्व टिकवून होते.. चित्रपट हा समाजाचा, सामाजिक चळवळीचा आरसा असावा हा मराठीचा नेहमीचा अट्टहास. पण कल्पनेवर चित्र उभे करणे म्हणजे चित्रपट ही जनमाणसात असलेली आणि चूकीची नसलेली समजूत. मुळातच संस्कारक्षम, मार्मिक आणि विस्तृत दर्शन करणारी कला उभी करणे ही मराठी आणि बंगाली रंगभूमीची ओळख. बंगाली सिनेमा या वास्तववादी विषयांसोबत पुढे गेला सुद्धा. मराठी दिग्दर्शक मात्र तेथेच अडकून राहिला, किंबहूना त्याने त्या वास्तवाच एक वेगळ विश्व उभे केलं, त्यालाच आपण अमेरिका म्हणूया. विषयांची कमतरता या प्रांतात मुळीच नव्हती, नाही आणि नसणार.
देवराई, पूणे ५२ बघितल्यावर स्क्रीझोफेनिया सारख्या विषयांवर इतकी गंभीर आणि बोलकी creativity होणार नाही, सामना, वजीर, सिंहासन राजकारणाचे उत्तम नमूने. श्वास मधली भावनांची जुगलबंदी; नितळ मधले समाजभान; देऊळ, एलिझाबेथ एकादशी मधला अध्यात्म; गाभ्रीच्या पावसातली विदारकता; डोंबिवली फास्ट मधली तळतळ; जोगवा, प्रेमाची गोष्ट, मुंबई-पूणे-मुंबई मधल तरुणाईला आवडणार निरपेक्ष प्रेम; बालक पालक मधली जटिलता; येलो मधला दुर्दम्य आशावाद; बालगंधर्व, आमटेमधला दृढ निश्चय; सुखांत मधली अगतिकता; पिंजरा मधले गूढ नाते आणि असे अनेक..
लिहायला गेलो, संशोधन केलं (अर्थात संशोधन करायला लागणे यात आपल अपयश आहे) तर खूप खोल, अथांग सागर आहे, अष्टगंधित माती आहे आणि विहार करायला भव्य आकाश.. समृद्धता पैश्यात, व्यवहारात मोजाल तर दक्षिणात्य सिनेमा उजवा आहे हे मान्य. पण विषयांतील विविधता, आणि एकरूप होऊ इतकी सहजता या शर्यतीत कदाचित आपण खूप सरस आहोत. गरज आहे एका ‘होप’ ची, Branding ची, आणि Marketing ची. इथे ‘कोलंबस’ हा व्यक्तीसापेक्ष नसून तुम्ही, आम्ही हा समाज आहोत. २०० रुपये देऊन चेन्नई एक्स्प्रेस बघतात आणि इतर असले भंपक टोचण देणार नाहीत.. वेळेनुसार प्रगल्भ समाज तयार होतो हे २०१४ च्या निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहेच, रंगभूमी बाबत सुद्धा ते घोडामैदान दूर नाही.
आणि शेवटी त्या ‘क्ष’ व्यक्तीला, जनसमुदायाला आणि माझ्यासारख्या मोजक्या लोकांना
“चला उभारा शुभ्र शिडे ही गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तूला पामराला..”
मराठी रंगभूमी. तथाकथित, स्वयंघोषित राजकीय, चित्रपट समीक्षकांचा आवडतीचा विषय. त्याच पंक्तीतल्या ‘क्ष’ नावाच्या व्यक्तीने असाच आपल्या कधीही न भेटलेल्या फेसबूकवरिल आंधळ्या अनुयायांसमोर एक २५० शब्दांचा लेख प्रस्तूत केला. अर्थातच विषय बहुसंख्य मराठी जनसमुदायाला आवडेल, पटेल असाच होता. विषयाची एक बाजू होती, मराठी सिने अभिनेत्यांनी हिंदी मध्ये केलेल्या दुय्यम भूमिका ज्याच्याशी मी पण सहमत आहे आणि दूसरी बाजू होती मराठी आणि दक्षिणात्य चित्रपटांची केलेली तूलना, अर्थात जी देखील सगळ्यांना पटणारी पण तांत्रिक दृष्ट्या कधीही न सिद्ध होणारी..
प्रेमाचे लव्हाळे कविता आठवते का? एवढ्या वादळात, पावसात, लाटांत सुद्धा ते आपले अस्तित्व टिकवून होते.. चित्रपट हा समाजाचा, सामाजिक चळवळीचा आरसा असावा हा मराठीचा नेहमीचा अट्टहास. पण कल्पनेवर चित्र उभे करणे म्हणजे चित्रपट ही जनमाणसात असलेली आणि चूकीची नसलेली समजूत. मुळातच संस्कारक्षम, मार्मिक आणि विस्तृत दर्शन करणारी कला उभी करणे ही मराठी आणि बंगाली रंगभूमीची ओळख. बंगाली सिनेमा या वास्तववादी विषयांसोबत पुढे गेला सुद्धा. मराठी दिग्दर्शक मात्र तेथेच अडकून राहिला, किंबहूना त्याने त्या वास्तवाच एक वेगळ विश्व उभे केलं, त्यालाच आपण अमेरिका म्हणूया. विषयांची कमतरता या प्रांतात मुळीच नव्हती, नाही आणि नसणार.
देवराई, पूणे ५२ बघितल्यावर स्क्रीझोफेनिया सारख्या विषयांवर इतकी गंभीर आणि बोलकी creativity होणार नाही, सामना, वजीर, सिंहासन राजकारणाचे उत्तम नमूने. श्वास मधली भावनांची जुगलबंदी; नितळ मधले समाजभान; देऊळ, एलिझाबेथ एकादशी मधला अध्यात्म; गाभ्रीच्या पावसातली विदारकता; डोंबिवली फास्ट मधली तळतळ; जोगवा, प्रेमाची गोष्ट, मुंबई-पूणे-मुंबई मधल तरुणाईला आवडणार निरपेक्ष प्रेम; बालक पालक मधली जटिलता; येलो मधला दुर्दम्य आशावाद; बालगंधर्व, आमटेमधला दृढ निश्चय; सुखांत मधली अगतिकता; पिंजरा मधले गूढ नाते आणि असे अनेक..
लिहायला गेलो, संशोधन केलं (अर्थात संशोधन करायला लागणे यात आपल अपयश आहे) तर खूप खोल, अथांग सागर आहे, अष्टगंधित माती आहे आणि विहार करायला भव्य आकाश.. समृद्धता पैश्यात, व्यवहारात मोजाल तर दक्षिणात्य सिनेमा उजवा आहे हे मान्य. पण विषयांतील विविधता, आणि एकरूप होऊ इतकी सहजता या शर्यतीत कदाचित आपण खूप सरस आहोत. गरज आहे एका ‘होप’ ची, Branding ची, आणि Marketing ची. इथे ‘कोलंबस’ हा व्यक्तीसापेक्ष नसून तुम्ही, आम्ही हा समाज आहोत. २०० रुपये देऊन चेन्नई एक्स्प्रेस बघतात आणि इतर असले भंपक टोचण देणार नाहीत.. वेळेनुसार प्रगल्भ समाज तयार होतो हे २०१४ च्या निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहेच, रंगभूमी बाबत सुद्धा ते घोडामैदान दूर नाही.
आणि शेवटी त्या ‘क्ष’ व्यक्तीला, जनसमुदायाला आणि माझ्यासारख्या मोजक्या लोकांना
“चला उभारा शुभ्र शिडे ही गर्वाने वरती कथा या खुळ्या सागराला,
अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तूला पामराला..”
No comments:
Post a Comment